
इतिहासाचं पान
वसाहत काळात बहुजनांच्या शिक्षणासाठी महिला मिशनरींचे योगदान
ब्रिटिशांच्या ईस्ट इंडिया कंपनीचा अंमल देशाच्या विविध भागांत सुरु होण्याच्या काळात भारतातली तत्कालीन सामाजिक आणि शैक्षणिक स्थिती जाणून घेणे आवश्यक ठरते. त्याकाळात सामान्यजनांना, स्त्रियांना आणि शूद्रांना शिक्षणाच्या संधी मुळी नव्हत्याच.